काही पुस्तकं ही एखाद्या विषयाची सुरुवात म्हणून वाचायची असतात आणि तिथून पूढे तो विषय बाकीच्या पुस्तकातून समजून घ्यायचा असतो. Minimalism: Live a Meaningful Life हे अशाच प्रकारचे पुस्तक आहे. खरं तर तुकोबा चारशे वर्षांपूर्वीच सांगून गेलेत, "चित्ती असो द्यावे समाधान" म्हणजे आपल्याला जितकं मिळवता येईल, घेता येईल त्याच्या मागे न लागता समाधानी वृत्ती ठेवा.. भौतिक गोष्टीत कमी असल्या तरी समाधान मानता आलं पाहिजे. पण सध्या "रॅट रेस" आणि "ऐपतीच्या बाहेरच्या वस्तू घेण्याच्या" सवयीमुळे आपण वस्तूंमध्ये गुंतत चाललो आहोत. आणि गेल्या काही वर्षातल्या " जे जे पाश्चात्य ते ते अनुकरणीय " ह्या संकल्पनेप्रमाणे सगळेच " भौतिक सुखाचा ओला दुष्काळ" (माझी व्याख्या - आवडेल ते, वाटेल ते, दिसेल ते, शेजाऱ्यांकडे/मित्रांकडे/सहकाऱ् याकडे असेल ते आणि रीलवर दाखवतील ते सगळं घेऊन घर भरून जगणं म्हणजे "भौतिक सुखाचा ओला दुष्काळ") अनुभवत आहोत. पण जिथे हे उपजलं त्याच अमेरिकेतले लोक आता ह्या रॅट रेस ला आणि अनावश्यक वस्तू जमवण्याच्या वेड्या हट्टाला धोकादायक समजू लागले आहेत...
संभाजी महाराजांना हाल हाल करून ठार केल्यानंतर औरंगजेबाला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या, "मराठ्यांचे राज्य आता संपले, संभाजीला मी ठार केला. आणि राजाराम पण जिवंत नाहीये, आता कोण वाचवणार ह्या मराठ्यांच्या गादीला?" पण सह्याद्रीची वीर कन्या, वीर पत्नी आणि शिवरायांची सून वय वर्षे २५ असताना शस्त्रसज्ज होऊन, घोड्यावर मांड टाकून मराठा सैन्याचे नेतृत्व करते, आणि ती पुन्हा मोगलांची दमछाक करते.. आणि तोच औरंगजेब पुन्हा म्हणू लागतो, "मराठा लडकी तेज होती है। सह्याद्रीने कैसे ये आदमी और औरते पैदा किये है |" ह्याच त्या महाराणी ताराराणी.. ज्यांनी जुलमी औरंगजेबाला संताजी- धनाजी मागे लावून चक्रावून आणि छळून औरंगजेबाला ह्याच मऱ्हाटी मातीत गाडून टाकला, कायमचा ! स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा. ( ९ डिसेंबर)
Comments
Post a Comment