सध्या साठी-सत्तरीत असणाऱ्या पालकांनी मागच्या २० वर्षात एवढे प्रचंड बदल बघितले आहेत की जे त्यांच्या आधीच्या पिढीलाक्वचितच बघायला मिळाले असतील.. आणि ते ह्या बदलांना स्वीकारून खूप छान पद्धतीने जगात आहेत, कौतुक आहे त्यांचं खूप!
म्हणून जर कधी असं वाटत असेल ना की ते आपल्याला समजून घेत नाहयेत किंवा चिडचिड होत असेल तर फक्त एका गोष्टीचा विचार करायचा की आपल्याला सुद्धा समजत असून, माहिती असून सुद्धा काही डिजिटल गोष्टी accept करायला आणि शिकायलासुरुवातीला अवघड गेलंच होतं की.. तर मग त्यांना ह्या गोष्टी किती अवघड गेल्या असतील? अजूनही जात असतील..
आणि फक्त तंत्रज्ञानच नाही तर त्यासोबत समाजात, कामाच्या ठिकाणी, दैनंदिन जगण्यात, खाण्यापिण्यात अशा सगळ्याच बाबतीत गेल्या ५ वर्षात झालेले बदल व्हायला त्यांच्या आधीच्या पिढीला १५-२० वर्ष लागली असती पण ह्यांना तसा पर्यायच मिळाला नाही! हे फार सुपरफास्ट होतं त्यांच्यासाठी!
ह्या सगळ्या बाबींचा विचार आपण सहसा करत नाही आणि मग त्याचा परिणाम ताणतणाव निर्माण होण्यात होतो. आणि ह्यात खरं तरआता २५-४० वयात असणाऱ्या सगळ्यांनीच थोडं धीराने घेऊन आपल्या साठी-सत्तरीतल्या पालकांना समजावून घेतलं पाहिजे.. ते जर एवढे बदल स्वीकारत दोन पावलं चालत असतील तर आपण त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी चार पावलं चालायची तयारी ठेवली पाहिजे!
त्यांना गोष्टी पटकन समजत नसतील किंवा तंत्रज्ञान वापरताना अडचणी येत असतील तर चिडचिड करण्याआधी फक्त एवढंच लक्षातठेवायचं आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्यांना हे अवघड जातंय.. आणि, आपण लहान मूल असताना आपल्यालापण अशा अनेक अडचणी आल्या तरी त्यांना आपल्याला हिडीस-फिडीस करून वाऱ्यावर नाही सोडलं! आता संयमाने आणि प्रेमाने वागण्याची आपली वेळ आहे..
आपल्या आई-बाबांसाठी दोन पावलं जास्ती चालू या!
Comments
Post a Comment