संभाजी महाराजांना हाल हाल करून ठार केल्यानंतर औरंगजेबाला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या, "मराठ्यांचे राज्य आता संपले, संभाजीला मी ठार केला. आणि राजाराम पण जिवंत नाहीये, आता कोण वाचवणार ह्या मराठ्यांच्या गादीला?" पण सह्याद्रीची वीर कन्या, वीर पत्नी आणि शिवरायांची सून वय वर्षे २५ असताना शस्त्रसज्ज होऊन, घोड्यावर मांड टाकून मराठा सैन्याचे नेतृत्व करते, आणि ती पुन्हा मोगलांची दमछाक करते.. आणि तोच औरंगजेब पुन्हा म्हणू लागतो, "मराठा लडकी तेज होती है। सह्याद्रीने कैसे ये आदमी और औरते पैदा किये है |" ह्याच त्या महाराणी ताराराणी.. ज्यांनी जुलमी औरंगजेबाला संताजी- धनाजी मागे लावून चक्रावून आणि छळून औरंगजेबाला ह्याच मऱ्हाटी मातीत गाडून टाकला, कायमचा ! स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा. ( ९ डिसेंबर)