काही पुस्तकं ही एखाद्या विषयाची सुरुवात म्हणून वाचायची असतात आणि तिथून पूढे तो विषय बाकीच्या पुस्तकातून समजून घ्यायचा असतो. Minimalism: Live a Meaningful Life हे अशाच प्रकारचे पुस्तक आहे. खरं तर तुकोबा चारशे वर्षांपूर्वीच सांगून गेलेत, "चित्ती असो द्यावे समाधान" म्हणजे आपल्याला जितकं मिळवता येईल, घेता येईल त्याच्या मागे न लागता समाधानी वृत्ती ठेवा.. भौतिक गोष्टीत कमी असल्या तरी समाधान मानता आलं पाहिजे. पण सध्या "रॅट रेस" आणि "ऐपतीच्या बाहेरच्या वस्तू घेण्याच्या" सवयीमुळे आपण वस्तूंमध्ये गुंतत चाललो आहोत. आणि गेल्या काही वर्षातल्या " जे जे पाश्चात्य ते ते अनुकरणीय " ह्या संकल्पनेप्रमाणे सगळेच " भौतिक सुखाचा ओला दुष्काळ" (माझी व्याख्या - आवडेल ते, वाटेल ते, दिसेल ते, शेजाऱ्यांकडे/मित्रांकडे/सहकाऱ् याकडे असेल ते आणि रीलवर दाखवतील ते सगळं घेऊन घर भरून जगणं म्हणजे "भौतिक सुखाचा ओला दुष्काळ") अनुभवत आहोत. पण जिथे हे उपजलं त्याच अमेरिकेतले लोक आता ह्या रॅट रेस ला आणि अनावश्यक वस्तू जमवण्याच्या वेड्या हट्टाला धोकादायक समजू लागले आहेत
माझ्या मते वैचारिक साहित्य म्हणजे लेखकाने सत्याचा आधार घेऊन स्वतःचे विचार परखडपणे लिहिलेले साहित्य . हे साहित्य वाचकाच्या विचारांना चालना देण्याचे आणि मतपरिवर्तन करण्याला कारणीभूत ठरते . वाचकाला तात्विक , तर्कसुसंगत आणि ज्ञानाधिष्ठित विचारांचे खाद्य देऊन वैचारिक प्रगतीच्या वाटेवर दोन पाऊले पुढे घेऊन जाण्याचे काम ह्या साहित्याने गेली अनेक शतके केले आहे . वैचारिक साहित्याकडे आकृष्ट होऊन त्याचा अभ्यास करण्याचा विचार करणारी वाचकमंडळी म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या वाटेवरचे वारकरीच आहेत जणू ! वैचारिक साहित्याचे वेगळेपण - ललित साहित्यात लेखक भाव , कल्पना , कुतूहल , भीती अशा भावनांना चालना देत असतो तर वैचारिक साहित्यात फक्त विचारांना वैचारिक आणि मत परिवर्तनाला महत्व असते . मेंदूला झिणझिण्या आणणारे शब्द आणि त्यांचे अर्थ येथे उतरविलेले असतात ! वैचारिक साहित्य लेखकापेक्षा वाचकाचीच जास्त कसोटी घेत असते ! वैचारिक साहित्य वाचताना लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मतांना / मान्यतांना आ
ह्या आठवड्यात मी काय वाचू प्रत्येकजण किमान, “आपल्या कामाच्या संबंधित लेख/पुस्तकाची ३०-४० पाने” नक्कीच वाचू शकतो! असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे ।।
Comments
Post a Comment